बुलडाणा ः पीकविमा (Crop insurance) मदतीच्या मुद्यावरून जिल्ह्यात घमासान सुरू झाले आहे. हा मुद्दा पेटल्याने व पोलिस (Police) तक्रार दाखल झाल्याने नवनवीन माहिती समोर येऊ लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय कृषीविमा कंपनीने स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान या जोखिमेच्या बाबींतर्गत पीक नुकसानीबाबत प्राप्त तक्रारीचे बाधित क्षेत्र व नुकसानीची टक्केवारी कृषी विभागाला न कळविता परस्पर पंचनामे केल्याचे अधिकाऱ्याच्या पत्रात स्पष्ट म्हटले आहे.
रविकांत तुपकर यांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर त्यांना प्रशासनाकडून एक लेखी पत्र देण्यात आले आहे. या पत्रात म्हटले की, योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विमाधारकांचे क्षेत्र बाधित झाल्यास त्या क्षेत्राची कृषी सहायक संबंधित नुकसानग्रस्त शेतकरी व विमा कंपनी प्रतिनिधीच्या उपस्थितीत नुकसानीचा पंचनामा करीत असतो.
या पंचनामा अहवालावर उपस्थितांची संयुक्त स्वाक्षरी घेतल्यानंतर पंचनामा ग्राह्य समजल्या जातो. परंतु भारतीय कृषीविमा कंपनीने स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान या जोखिमेच्या बाबींतर्गत पीक नुकसानीबाबत प्राप्त तक्रारीचे बाधित क्षेत्र व नुकसानीची टक्केवारी कृषी विभागाला न कळविता परस्पर पंचनामा केले आहेत.
या पंचनामा अहवालांवर कोणाचीही स्वाक्षरी न घेता नुकसानीची टक्केवारी व बाधित क्षेत्र अत्यंत कमी दाखवून पंचनामा अहवाल विमा कंपनीस सादर केलेले आहे. यानंतर कृषी विभागाला मिळालेल्या यादीतील शेतकऱ्यांना अत्यल्प प्रमाणात नुकसान भरपाई दिल्याचे दिसून आले. त्यामुळेच विमाधारक शेतकऱ्यांचा आक्रोश निर्माण झालेला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
© agrowon 2022

Article Tags:
news